ठाणे जिल्हयात रविवारी ३१९ नवीन रूग्णांची नोंद झाली त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ५ हजार ७०१वर पोहचला आहे. एकटया ठाण्यात १२७ नवीन रूग्ण आढळून आले, त्यामुळे ठाण्याची रूग्ण संख्या २०१८ झाली आहे. जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७२५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार ३५९ झाल आहे. तर २४ तासांत मुंबईत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ९८८ झाला आहे.
1725 new #COVID119 positive cases have been reported in Mumbai today; taking the total number of cases to 30,359. Death toll rises to 988 after 39 deaths were reported today: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/B7OMHCX9Jr
— ANI (@ANI) May 24, 2020
धारावी आज २९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५४१ झाला आहे.
- आज माहिममध्ये कोरोनाच ११ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१७वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये आज कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा २१९वर पोहोचला आहे.
राज्यात आज कोरोनाचेमुळे ५८ जणांचा बळी गेला आहे तर ३ हजार ४२ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा १ हजार ६३५ झाला आहे.
3041 new #COVID19 cases & 58 deaths reported today, taking the total number of cases to 50231, of which 33988 are active cases. Death toll stands at 1635. Total 1196 people recovered & discharged today, 14600 patients have been discharged till date: Maharashtra Health Department pic.twitter.com/Y9ppeipZdk
— ANI (@ANI) May 24, 2020
अ.क्र | जिल्हा महानगरपालिका | बाधित रुग्ण | मृत्यू |
१ | मुंबई महानगरपालिका | ३०५४२ | ९८८ |
२ | ठाणे | ४२० | ४ |
३ | ठाणे मनपा | २५९० | ३६ |
४ | नवी मुंबई मनपा | २००७ | २९ |
५ | कल्याण डोंबवली मनपा | ८८९ | ७ |
६ | उल्हासनगर मनपा | १६९ | ३ |
अ.क्र | जिल्हा महानगरपालिका | बाधित रुग्ण | मृत्यू |
७ | भिवंडी निजामपूर मनपा | ८६ | ३ |
८ | मीरा भाईंदर मनपा | ४६४ | ५ |
९ | पालघर | ११४ | ३ |
१० | वसई विरार मनपा | ५६२ | १५ |
११ | रायगड | ४१२ | ५ |
१२ | पनवेल मनपा | ३३० | १२ |
ठाणे मंडळ एकूण | ३८५८५ | १११० | |
१३ | नाशिक | ११५ | ० |
१४ | नाशिक मनपा | ११० | २ |
१५ | मालेगाव मनपा | ७११ | ४४ |
१६ | अहमदनगर | ५३ | ५ |
१७ | अहमदनगर मनपा | २० | ० |
१८ | धुळे | २३ | ३ |
१९ | धुळे मनपा | ९५ | ६ |
२० | जळगाव | २९४ | ३६ |
२१ | जळगाव मनपा | ११७ | ५ |
२२ | नंदूरबार | ३२ | २ |
नाशिक मंडळ एकूण | १५७० | १०३ | |
२३ | पुणे | ३४० | ५ |
२४ | पुणे मनपा | ५०७५ | २५१ |
२५ | पिंपरी चिंचवड मनपा | २६७ | ७ |
२६ | सोलापूर | २४ | २ |
२७ | सोलापूर मनपा | ५७७ | ३९ |
२८ | सातारा | २७९ | ५ |
पुणे मंडळ एकूण | ६५६२ | ३०९ | |
२९ | कोल्हापूर | २३६ | १ |
३० | कोल्हापूर मनपा | २३ | ० |
३१ | सांगली | ६९ | ० |
३२ | सांगली मिरज कुपवाड मनपा | ११ | १ |
३३ | सिंधुदुर्ग | १० | ० |
अ.क्र | जिल्हा महानगरपालिका | बाधित रुग्ण | मृत्यू |
३४ | रत्नागिरी | १५५ | ३ |
कोल्हापूर मंडळ एकूण | ५०४ | ५ | |
३५ | औरंगाबाद | २३ | ० |
३६ | औरंगाबाद मनपा | १२३३ | ४६ |
३७ | जालना | ५६ | ० |
३८ | हिंगोली | ११२ | ० |
३९ | परभणी | १७ | १ |
४० | परभणी मनपा | ५ | ० |
औरंगाबाद मंडळ एकूण | १४४६ | ४७ | |
४१ | लातूर | ६७ | ३ |
४२ | लातूर मनपा | ४ | ० |
४३ | उस्मानाबाद | ३१ | ० |
४४ | बीड | २६ | ० |
४५ | नांदेड | १५ | ० |
४६ | नांदेड मनपा | ८३ | ५ |
लातूर मंडळ एकूण | २२६ | ८ | |
४७ | अकोला | ३६ | २ |
४८ | अकोला मनपा | ३६६ | १५ |
४९ | अमरावती | १३ | २ |
५० | अमरावती मनपा | १५५ | १२ |
५१ | यवतमाळ | ११५ | ० |
५२ | बुलढाणा | ४० | ३ |
५३ | वाशिम | ८ | ० |
अकोला मंडळ एकूण | ७३३ | ३४ | |
५४ | नागपूर | ७ | ० |
५५ | नागपूर मनपा | ४६४ | ७ |
५६ | वर्धा | ४ | १ |
५७ | भंडारा | १० | ० |
५८ | गोंदिया | ३९ | ० |
५९ | चंद्रपूर | १० | ० |
अ.क्र | जिल्हा महानगरपालिका | बाधित रुग्ण | मृत्यू |
६० | चंद्रपूर मनपा | ९ | ० |
६१ | गडचिरोली | १३ | ० |
नागपूर एकूण | ५५६ | ८ | |
इतर राज्ये /देश | ४९ | ११ | |
एकूण | ५०२३१ | १६३५ |
मुंबईहून देशांतर्गत उड्डाणांसाठी दररोज २५ टेक ऑफ आणि २५ लँडिंग विमान करण्याची परवानगी देण्यास महाराष्ट्र शासनाने सहमती दर्शविली आहे. तसंच ही संख्या हळूहळू वाढवली जाईल. लवकर राज्य सरकार यासंदर्भात तपशील व मार्गदर्शक सूचना जारी करेल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
Maharashtra govt has agreed to allow 25 take offs and 25 landings everyday for domestic flights from Mumbai. This number will be increased gradually. State govt will issue details and guidelines in this regard soon: Maharashtra Minister Nawab Malik. (File pic) pic.twitter.com/VnctP8YpK5
— ANI (@ANI) May 24, 2020
बँक ऑफ महाराष्ट्राने कृषी, बचत गट, किरकोळ, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) अंतर्गत मार्च २०२० ते मे २०२० दरम्यान जवळपास १ लाख लाभार्थींना २७८९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
Bank of Maharashtra has sanctioned loans amounting to Rs 2789 crores under Agriculture, Self Help Groups (SHGs), Retail, Ministry of Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) with almost 1 lakh beneficiaries between March 2020 and May 2020: Bank of Maharashtra pic.twitter.com/geO1o4g3ja
— ANI (@ANI) May 24, 2020
ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरीही आजअखेर पर्यंत तब्बल २ हजार ७७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ही ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बातमी आहे. नवजात बालकापासून ९१ वर्षांच्या आजीपर्यंतच्या रूग्णांचा यामध्ये समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल ३० हजार ३३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील २२ हजार ९६२जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर ५ हजार ३८८ जण कोरोनाग्रस्त झाले होते. आज अखेरपर्यंत १६३ जणांचे मृत्यू झाले असून ठाणे जिल्ह्यात ३ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हम होंगे कामयाब ही भावना ठेवून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित रहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोना रुग्ण बरे होत असून काळजी करू नका, काळजी घ्या असा विश्वास जिल्हावासियांच्या मनात निर्माण करण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न या बळावर कोरोना युद्ध जिंकणे सहज शक्य आहे असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्या परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.
२४ तासात ८७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
Maharashtra: 87 police personnel of the state found COVID-19 positive in last 24 hours taking total number of affected cops to 1,758 out of which 18 have died due to the virus and 673 have recovered. pic.twitter.com/gnA4bLRgt9
— ANI (@ANI) May 24, 2020
देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असं असलं तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
उल्हासनगरमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. उल्हाससनगरमध्ये कोरोनारूग्णांची संख्या १५० वर गेली आहे.
औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात नवे २८ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२७६वर पोहचली आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन म्हणजेच लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईमध्ये दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये एक हजार ५६६ नव्या रूग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजार ६३४ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबई शहरात आहे. मागील २४ तासांत मुंबईमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या बळींची संख्या ९४९ वर गेली आहे.