घरताज्या घडामोडीजयसिंगराव गायकवाड यांची भाजपला सोडचिठ्ठी

जयसिंगराव गायकवाड यांची भाजपला सोडचिठ्ठी

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भाजपसाठी धुसर बनले आहे. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिल्याने ही निवडणूक पक्षासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

एकीकडे गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असताना बंडखोर उमेदवार रमेश पोखळे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आता निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये फूट पडणार, हे उघड आहे.
भाजपच्या मतांची फाटाफूट दृष्टिक्षेपात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतिश चव्हाण निश्चिंत झाले आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक अगोदरपासूनच भाजपसाठी अवघड मानली जात होती. त्यामध्ये बंडखोरीची भर पडल्याने यंदा भाजपसाठी मराठवाड्याचा गड काबीज करणे जवळपास अशक्यप्राय बाब मानली जात आहे.

- Advertisement -

मात्र, आता पक्षाने पुनर्वसन करायला घेतलेल्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मराठवाडा पदवीधरची आमदारकीची जागा गेल्या दोन निवडणुका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती खेचून आणण्यासाठी भाजप शक्य ते प्रयत्न करतेय हे मुंडे यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणातले सगळेच मार्ग वापरून आपली बाजू भक्कम करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे या लढाईत कोणाचा विजय होईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपला मस्ती आलीय-गायकवाड
भाजपला मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा पण जयसिंगराव गायकवाड यांनी केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -