घरताज्या घडामोडी२४ तासानंतर संपूर्ण भारतात उष्णतेची लाट संपेल - हवामान विभाग

२४ तासानंतर संपूर्ण भारतात उष्णतेची लाट संपेल – हवामान विभाग

Subscribe

येत्या ४ दिवसात तापमान ४० अंश सेल्सियसच्या खाली जाईल आणि २४ तासानंतर संपूर्ण भारतातून उष्णतेची लाट संपेल.

जोरदार उन्हामुळे त्रस्त झालेल्या उत्तर भारतातील लोकांना गुरुवारी कोसळलेल्या पावसात थोडा दिलासा मिळाला. भारतीय हवामान खात्याचे उपसंचालक आनंद शर्मा म्हणाले की, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ४०-५० किमी वेगाने वारे वाहू शकतात. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या ४ दिवसात तापमान ४० अंश सेल्सियसच्या खाली जाईल आणि २४ तासानंतर संपूर्ण भारतातून उष्णतेची लाट संपेल. तर, मालदीव-कोमोरिन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमानचा उर्वरित भाग पुढील ४८ तासांत नैऋत्य मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करीत आहे.

केरळमध्ये १ जूनच्या सुमारास नैऋत्य मॉन्सूनच्या प्रारंभासाठी परिस्थिती अनुकूल असण्याची अपेक्षा आहे. ३१ मेच्या सुमारास दक्षिण-पूर्व आणि लगतच्या पूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, खालच्या स्तरावर वेगवान वाऱ्यामुळे हवामान बदलले. दिल्ली-एनसीआरमध्ये २९-३० मे रोजी धूळ वादळ व गडगडाटासह वादळे ही ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

- Advertisement -

विज्ञान विभागाने म्हटले की, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून १ जूनला केरळला धडकेल. विभागाने १५ मे रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, ५ जूनला मान्सून दक्षिणेकडील राज्यात धडक देईल. केरळमध्ये मान्सून साधारणत: १ जूनला धडकतो. मात्र, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाच्या गतीला मदत मिळण्याची शक्यता आहे.

३१ मे ते ४ जून दरम्यान आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकेल, असे या विभागाने म्हटले आहे. १ जून रोजी केरळमध्ये मान्सून आणण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल आहे. कमी दाबाचा क्षेत्र हा कोणत्याही चक्रीवादळाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाचे रूप घेईलच असे नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदा देशात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विभाग म्हणाले की, पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या ४८ तासांत दबावच्या क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत दक्षिण-ओमान आणि पूर्व येमेनच्या किनाऱ्याकडे उत्तर-पश्चिम दिशेने जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान स्थितीनुसार दक्षिण द्वीपकल्पात २८ ते ३१ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ३०-३१ मे रोजी केरळ आणि लक्षद्वीपमध्येही मुसळधार पाऊस पडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -