घरदेश-विदेश'ओवैसींनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी'

‘ओवैसींनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी’

Subscribe

ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी अशी टीका भाजप नेते राजा सिंह यांनी केलं आहे.

तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपचे नेते राजा सिंह यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी अशी टीका केली आहे. तसेच तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास भारत माता की जय आणि वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून देण्याचं विधान देखील राजा सिंह यांनी केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत माता की जय म्हणणार नाही असं विधान अकबरूद्दीन ओवैसी अनेकवेळा जाहीर सभांमधून करतात. त्यांच्या या विधानाला आता भाजपचे नेते राजा सिंह यांनी आता पाकिस्तानमध्ये जाऊन भारत माता की जय म्हणणार का? असा सवाल केला आहे. तुम्हाला भारत माता की जय म्हणायचं नसेल, तसेच तुमचं भारतावर प्रेम करत नसणाऱ्या गद्दारांनी पाकिस्तानात जावं आणि पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी असं विधान राजा सिंह केलं आहे. तसेच भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर काढू. आणि जर कुणी प्रतिकार  करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील राजा सिंह यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -