संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी, निकाल दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल जाहीर केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. यामध्ये अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळीने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाचे स्वागत करत ट्विट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या निकालानंतर केले पहिले ट्विट…
“देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर आपला निर्णय सांगितला असून या निर्णयाला कोणाचाही विजय-पराजय समजले जाऊ नये. रामभक्ती किंवा रहीमभक्ती, ही वेळ आपली भारतभक्ती अधिक बळकट करण्याचा आहे. देशातील नागरिकांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखावी”, असे ट्विटमध्ये सांगत मोदींनी समस्त जनतेला अहवान केले आहे.
सुप्रीम कोर्ट का यह फैसला कई वजहों से महत्वपूर्ण है:
यह बताता है कि किसी विवाद को सुलझाने में कानूनी प्रक्रिया का पालन कितना अहम है।
हर पक्ष को अपनी-अपनी दलील रखने के लिए पर्याप्त समय और अवसर दिया गया।
न्याय के मंदिर ने दशकों पुराने मामले का सौहार्दपूर्ण तरीके से समाधान कर दिया।— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2019
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’, असे म्हटले आहे.
हमारी भूमिका शुरू से रही है के सुप्रीम कोर्ट का जो फैसला हो गा हम मानें गे और सब मानें ,
आशा है देश में और कोई नया विवाद धर्म के नाम पर पैदा नही होगा ,@MumbaiNCP @MumbaiNCP@ANI @PTI_News— Nawab Malik (@nawabmalikncp) November 9, 2019
‘कित्येक दशकांपासून सुरू असलेला श्री रामजन्मभूमीचा कायदेशीर वाद आजच्या निकालानंतर संपला आहे. मी भारतीय न्यायव्यवस्था आणि सर्व न्यायाधीशांचे अभिनंदन करतो.’, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत निकालानंतर स्वागत केले.
दशकों से चले आ रहे श्री राम जन्मभूमि के इस कानूनी विवाद को आज इस निर्णय से अंतिम रूप मिला है। मैं भारत की न्याय प्रणाली व सभी न्यायमूर्तियों का अभिनन्दन करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) November 9, 2019
‘अयोध्येच्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मी आणि आमचा पक्ष या निर्णयाचा आदर करतो. अशी अपेक्षा आहे की सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना या निर्णयाचा आदर करतील.’,असे ट्विट करत या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सुप्रीम कोर्ट ने आज अयोध्या विवाद पर अपना अंतिम फैसला सुनाया है। मैं और हमारी पार्टी इस निर्णय का सम्मान करते है। उम्मीद है कि सभी राजनीतिक दल और धार्मिक संगठन इस फैसले का आदर करेंगे।
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 9, 2019
‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधलं जावं. पण यावेळी फक्त एकच वाटतं, यावेळी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’, अशी प्रतिक्रिया अयोध्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिली.
#AYODHYAVERDICT #RamMandir #AyodhyaJudgment pic.twitter.com/Lgy2JapDZD
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2019
The Judgment of Hon'ble Supreme Court on Ayodhya is historic. The Judgement will further strengthen India’s social fabric.
I urge everyone to take the verdict with equanimity and magnanimity. I also appeal to the people to maintain peace & harmony after this landmark verdict. pic.twitter.com/DWnVRPuXMG
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 9, 2019
माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्णय का स्वागत है, देश की एकता व सद्भाव बनाए रखने में सभी सहयोग करें, उत्तर प्रदेश में शांति, सुरक्षा और सद्भाव का वातावरण बनाए रखने के लिए उत्तर प्रदेश सरकार पूर्ण रूप से प्रतिबद्ध है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 9, 2019
सभी पक्षों की दलीलें सुनने के बाद SC की बेंच के पाँचों जजों ने एकमत से आज अपना निर्णय दिया। हम SC के फ़ैसले का स्वागत करते हैं। कई दशकों के विवाद पर आज SC ने निर्णय दिया। वर्षों पुराना विवाद आज ख़त्म हुआ। मेरी सभी लोगों से अपील है कि शांति एवं सौहार्द बनाए रखें
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 9, 2019
दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी या आधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे.