घरदेश-विदेशसीबीएससीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

सीबीएससीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

Subscribe

सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयात माहिती

कोरोनाचं संकट दिवसागणिक गडद होत चालंल आहे. याचा फटका शालेय वेळापत्रकालाही बसला आहे. सीबीएसई बोर्डाने जुलै महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

- Advertisement -

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचं निश्चित केलं होतं. सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान होणार होत्या.मात्र, देशातील कोरोना परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा घेण्यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, ते नंतर परीक्षा देऊ शकतात. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

दरम्यान, सीबीएसईबरोबरच आयसीएसई बोर्डानेही दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, बोर्डाने दिलेल्या गुणांवर समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डानं नकार दिला असल्याचं मेहता म्हणाले. तथापि, दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती. त्यावर सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षेसंदर्भात नव्यानं सूचना जारी करावी, तसेच राज्य मंडळांच्या परीक्षांच्या स्थितीसंदर्भातही उत्तर द्यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -