आएनएक्स प्रकरणाची शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांना अटक न करता तुम्हालाच अटक का केली? असा सवाल आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. तुरुंगात असलेले पी. चिदंबरम यांनी त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट टाकण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावतीने केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
I have requested my family to tweet on my behalf the following :-
People have asked me 'If the dozen officers who processed and recommended the case to you have not been arrested, why have you been arrested? Only because you have put the last signature?'
I have no answer.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 9, 2019
काय म्हटलय ट्विटमध्ये?
मागील आठवड्यात पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. सध्या तुरुंगात असलेले पी. चिदंबरम यांनी कुटुंबियांना त्यांच्या ट्विटर अकाउंटची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या पी. चिदंबरम यांच्या पहिल्याच ट्विटमध्ये अटकेवर सवार केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, डझनपेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तुमच्याकडे शिफारस केली. त्यांना अटक का करण्यात आली नाही? असा सवाल लोक मला करत आहेत. या प्रकरणावर केवळ अंतिम सही केल्याने तुम्हाला अटक झाली का? असा सवाल लोक करत असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यापुढे केलेल्या ट्विटमध्ये पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, “लोकांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने काहीच चूक केली नसून कुणालाही अटक होऊ नये असे मला वाटते.”