काही दिवसांपूर्वी घडलेलं ‘जामनेर’ प्रकरण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी जामनेर मारहाण प्रकरणातील पीडितांविषयी भाष्य करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये राहुल जामनेर पीडितांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलले होते.
मात्र, असे असले तरी राहुल यांनी पीडित मुलांच्या मारहाणीचा व्हिडीओ ट्वीटद्वारे शेअर केल्यामुळे, जगभरात या मुलांची ओळख उघड झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पीडित मुलांच्या नातेवाईकांनी यासंदर्भात बालहक्क आयोगाकडे राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं समजतंय. दरम्यान याप्रकरणी बालहक्क आयोगाकडून राहुल यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान यासंदर्भात राहुल गांधींकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र के इन दलित बच्चों का अपराध सिर्फ इतना था कि ये एक “सवर्ण” कुएं में नहा रहे थे।
आज मानवता भी आखरी तिनकों के सहारे अपनी अस्मिता बचाने का प्रयास कर रही है।
RSS/BJP की मनुवाद की नफरत की जहरीली राजनीति खिलाफ हमने अगर आवाज़ नहीं उठाई तो इतिहास हमें कभी माफ नहीं करेगा pic.twitter.com/STeBSkI1q1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2018
नक्की काय होतं जामनेर प्रकरण?
विहिरीत पोहायला गेले म्हणून जामनेरमधल्या तीन मातंग समाजातील तरुणांना मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर गावात त्यांची नग्न धिंडही काढण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलांना नग्नावस्थेत मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या वाकडी या गावातली ही घटना होती. याप्रकरणी मातंग समाजातील लोकांनी निषेध नोंदवला होता.