घरताज्या घडामोडीदेशात २४ तासांत ९,३०४ नवे रुग्ण; २६० जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत ९,३०४ नवे रुग्ण; २६० जणांचा मृत्यू

Subscribe

देशात २४ तासांत ९,३०४ नवे रुग्ण आढळून आले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली आहे. त्यापैकी ६ हजार ०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ०४,१०७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख ०६ हजार ७३७ आहेत.

राज्यात २५६० नवे रुग्ण

राज्यात बुधवारी २५६० नवे रुग्ण सापडले असून, करोनाबाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. त्याचप्रमाणे १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा २५८७ वर पोहोचला आहे. बुधवारी ९९६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ३२ हजार ३२९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

१ मे ते १ जूनदरम्यान राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जूनला तो देशाच्या सरासरीपेक्षा (४.७४ % ) देखील कमी झालेला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील करोना प्रसाराचा वेग मंदावत आहे. १ मे रोजी रुग्ण वाढीचा दर ७.७६ टक्के होता. त्याचवेळी रुग्ण दुपटीचा वेग ९.२७ दिवस इतका होता. मात्र मे महिन्यामध्ये रुग्ण वाढीचा दर सातत्याने कमी होण्याबरोबरच रुग्ण दुपटीचा वेगही वाढताना दिसत आहे. १५ मे रोजी रुग्णवाढीचा दर ६.२३ टक्के तर रुग्ण दुपटीचा वेग ११.५६ दिवस झाला. त्याचप्रमाणे ३० मे रोजी हाच दर ४.७२ टक्के, तर दुपटीचा वेग १५.२६ दिवस झाला. १ जूनला ४.१५ टक्के, तर १७.३५ दिवस झाला.

१२२ करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात १२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यामध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे २,मीरा भाईंदर १, वसई विरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १,नंदूरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २, तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. बुधवारी नोंद झालेल्या मृत्युंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. १२२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

- Advertisement -

तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्युंपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्युंपैकी मुंबई ३०,सोलापूर १०, औरंगाबाद ६, नवी मुंबई ३, धुळे ३, जळगाव २, कोल्हापूर २, ठाणे २, अहमदनगर १, अकोला १, नंदूरबार १,पुणे १ , उल्हासनगर १, वसई, विरार १ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.


हेही वाचा – वादळानंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -