जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तर मागील २४ तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Spike of 5,609 #COVID19 cases & 132 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 112359, including 63624 active cases & 3435 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/NTJ4SXz9qZ
— ANI (@ANI) May 21, 2020
देशात १ लाख १२ हजार ३५९ कोरोनाबाधित
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १२ हजार ३५९ वर गेली आहे. तर ६३ हजार ६२४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आली आहे.
जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केला गेला आहे. १ लाख लोकसंख्येमागे जगभरात ६२.३ करोना रुग्ण आढळले आहेत. पण, भारतात ही संख्या केवळ ७.९ इतकीच आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
मृत्यूचे प्रमाण ०.२ टक्के
भारतात १ लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण ०.२ टक्के आहे. तर जगभरातील सरासरी ४.२ टक्के आहे. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी २.९ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून ३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.४५ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा – दिल्लीः कोरोना लसीच्या नावावर दिलं विष, असा झाला खुलासा