घरदेश-विदेशपराभव दिसू लागल्यानेच आता ईव्हीएमला दोष

पराभव दिसू लागल्यानेच आता ईव्हीएमला दोष

Subscribe

विरोधकांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष द्यायचे ठरवले आहे, अशी माहिती मला मिळाली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असे दिसते की पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचे त्यांनी ठरवले आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परीक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नव्हता वगैरे अशी कारण देतो अगदी त्याप्रमाणे’, विरोधक ईव्हीएमला दोष देतात, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

‘श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिले असेल. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील त्याच परिस्थितीतून जात होता’. झारखंडमध्ये तुम्हीही अनुभव घेत असाल की ज्या ठिकाणी लोक सुर्यास्तानंतर बाहेर पडण्यास घाबरायचे तिथे आता परिस्थिती बदलत आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. या चौकीदाराने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही घरात घुसून दहशतवाद्यांना मारले आहे. आज प्रत्येक दहशतवाद्याच्या मनात भीती आहे की आपण काही चूक केली तर मोदी आहे असे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि त्यांच्या महाभेसळ सहकार्‍यांची दहशतवादासंबंधी काय भूमिका आहे हे लक्षात ठेवा असे यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -