घरताज्या घडामोडी...आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!

…आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!

Subscribe

उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघाट  गावात एका व्यक्तीने घरातील शुल्लक वादावरून आपल्या तीन मुलींना घाघरा नदीत  फेकून दिले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आपल्या मित्राच्या मदतीने सफरराज नावाच्या आरोपीने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकले अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक ब्रिजेश सिंह यांनी येथे सांगितले की, सरफराज नावाच्या व्यक्तीने आपल्या मित्र नीरजच्या मदतीने मोटरसायकलवरून घाघरा नदीच्या काठी आपल्या मुलींना पळवून नेले. त्यानंतर त्याने सना (वय ७), सबा (वय ४) आणि शमा (वय २) या मुलींना घाघरा नदीच्या बिरहार घाटावर आणले आणि तिन्ही मुलींना एक-एक करुन नदीत फेकले. ते म्हणाले की, जवळच्या काही गावक्यांनी नदीत उडी घेऊन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

- Advertisement -

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यांनी मुलींचा शोध सुरू केला पण आतापर्यंत कोणाचाही शोध लागलेला नाहीये. पोलिसांनी सरफराज आणि त्याचा मित्र नीरज याला अटक केली आहे. सरफराज साधाराण २० दिवसांपूर्वी मुंबईहून परत आला होता. सरफराज हा पर्चंड व्यसनी माणूस होता. या घटनेमागे घरगुती वाद असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाहीये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हे ही वाचा – पीपीई किट आता मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार – अजोय मेहता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -