घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये चकमक; पाच नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये चकमक; पाच नक्षलवादी ठार

Subscribe

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या चकमकीत दोन जवान देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही चकमक शनिवारी सकाळी नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड येथील जंगलमध्ये घडली. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहिम सुरु करण्यात आली. चकमकी दरम्यान काही नक्षलवाद्यांनी पळ ठोकला. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -