इंडोनेशियातील पापुईमध्ये अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे आतपर्यंत ७९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात भूकंप आणि पूर एकाचवेळी आल्यामुळे मृतांचा आकडा वाढणार असल्याची भिती वर्तवली जात आहे. पूरामुळे येथील जनजीवन अस्त व्यस्त झाले आहे. येथील नागरिक आपले जीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. प्रशासनाद्वारे नागरिकांना वाचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जयपूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून जयपुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती. या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर पुरा पाठोपाठ आलेल्या भूकंपामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. आतापर्यंत ४ हजार २०० नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.
The death toll from flash #floods and #landslides that hit Papua province in eastern #Indonesia has increased to 73, as search-and-rescue personnel continue to scour debris for victims and survivors, officials said Sunday.#Sharjah24 pic.twitter.com/khRtz2ZiV2
— الشارقة24 (@sharjah24) March 18, 2019
नैसर्गिक संकट
इंडोनेशिया येथे यापूर्वीही अनेक नैसर्गिक संकटे आली होती. या संकटामुळे येथे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जीवीतहाणी मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.