प्राप्तिकर परतावा भरण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ही १५ दिवसांची वाढ असून आता तुम्हाला ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे. यापूर्वी नागरीकांना ३१ ऑगस्ट आणि त्या आधी ३१ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली होती. वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परतावा दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून आता ३१ ऑक्टोबर २०१८ झाली आहे. केंद्र सरकारने आज, सोमवारी मुदत वाढीची घोषणा केली असून त्यांच्या इन्कम टॅक्स इंडिया या ट्विटर हँडलवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
CBDT further extends due dt for filing of IT Returns & audit reports from 15th Oct,2018 to 31st Oct, 2018 for all assessees liable to file ITRs for AY 2018-19 by 30.09.2018,after considering representations from stakeholders. Liability to pay interest u/s234A of ITAct will remain
— Income Tax India (@IncomeTaxIndia) October 8, 2018
१५ दिवसांची मुदत वाढ
आयकर विभागाने ही मुदतवाढ १५ ऑक्टोबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ म्हणजे १५ दिवसांची वाढ झाली आहे. यापूर्वी ती ३१ सप्टेंबर २०१८ इतकी होती. या कालावधीत २०१७-१८ या आर्थिक वर्षातील आयकर परतावा भरता येणार आहे. मुदत वाढ केलेल्या तारखेच्या आत आयकर अधिनियम, कलम २३४ ए इन्कम टॅक्स अॅक्ट, १९६१ नुसार परतावा भरावा लागणार आहे, असे केंद्रीय आयकर संचालक मंडळाने सोमवारी सांगितले.
आयकर परताव्याची प्रक्रीया
ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून तसेच इतर उत्पन्न असेल, तर त्याला प्राप्तिकराचा आयटीआर १ आणि आयटीआर २ दाखल करावा लागतो. आयटीआर ३ मध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.