‘भारत लवकरच जागातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल’, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठीच्या सपोर्ट आणि आऊटरीच कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये ते बोलत होते. यावेळी अरुण जेटली यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम या तिनही गटातील उद्योजकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक केलं. आजच्या घडीला या तिनही गटातील मिळून एकूण ६.५ कोटी उद्योग, हे ११ कोटी भारतीयांना रोजगार देत असल्याची माहितीही जेटली यांनी यावेळी दिली. तसंच येत्या काही काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होईल, याची खात्री अल्याचंही ते म्हणाले.
Addressing at the launch of Support and Outreach Initiative for MSMEs, New Delhi, November 2, 2018 https://t.co/TStXi0hrFf
— Arun Jaitley (@arunjaitley) November 2, 2018
वाचा: CBI ची परिस्थिती दुर्देवी – अरूण जेटली
कार्यक्रमादरम्यान जेटली म्हणाले, ‘२०१४ साली भाजप सरकार येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये ९व्या क्रमांकावर होती. सध्या तिचा क्रमांक सहावा आहे. मात्र, २०१९ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा देशातील सर्वात मोठ्या पहिल्या ३ अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल, असा विश्वास मला आहे.’ पुढे जाऊन जेटली म्हणाले, की सरकारी निधीअंतर्गत सरकार लाभार्थ्यांसाठी ९० हजार कोटी रुपये राखून ठेवणार आहे, ज्याचा थेट फायदा सर्वसामन्यांना होईल. कार्यक्रमादरम्यान त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम गटातील उद्योजकांना मार्गदर्शनही केले.