भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारकडे विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांच्यासाठी ‘वीरचक्र’ या शौर्य पुरस्काराची शिफारस केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या बालाकोट येथे घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त करणाऱ्या १२ वैमानिकांनाही ‘वायुसेना पदक’ देण्याची शिफारस हवाई दलाने केंद्राकडे केली आहे. या १२ वैमानिकांनी पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा बोलबाला संपूर्ण जगात झाला होता. त्यामुळे एअर स्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांनाही वायुसेना पदक देण्याची शिफारस भारतीय हवाई दलाने केली आहे.
- Advertisement -