उत्तर प्रदेश जनपद कानपूरमधल्या बिल्हौर मकनपूर ठाणे क्षेत्रातील लखनऊ – आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच जण कारमध्ये होते तर बसचालकाचा समावेश आहे. कार आणि रोडवेज बसमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. ही बस आग्र्याहून बिहारच्या मुजफ्फरपूरला जात होती. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिकदृष्ट्या या अपघाताच्या मागे बसचालकाचा हलगर्जीपणा असल्याचे समोर आले आहे.
Kanpur: At least 4 persons dead in a car accident on Agra – Lucknow Expressway in Bilhaur, earlier today. pic.twitter.com/Vs48Ljx4dg
— ANI UP (@ANINewsUP) February 18, 2020
असा घडला अपघात
बस आग्र्याहून बिहारच्या मुजफ्फरपूरला जात होती. त्या दरम्यान बस डिव्हायडरवरुन उडी घेऊन दुसऱ्या लेनमध्ये गेल्यानंतर हा अपघात झाला आहे. या बसने समोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीला तिने धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातामध्ये कारचे अक्षरश:पत्रेच निखळले. या अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस हट्टाला पेटली