मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात असणाऱ्या कडता या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमध्ये विजेच्या झटक्याने २० गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी झाली असून घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सागर जिले के ग्राम कड़ता में बिजली के तार टूटने से करंट से 20 गायों की मृत्यु की घटना बेहद दुखद।
नियमानुसार मृत गायों के मालिकों को आर्थिक सहायता प्रदान करने के निर्देश।
इस मामले की जाँच भी करवायी जायेगी। यदि किसी की लापरवाही या दोष सामने आया तो उस पर भी कड़ी कार्यवाही होगी।— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) August 25, 2019
अशी घडली घटना
मध्यप्रदेशात पडत असलेल्या मुसळधार पावसाने विजेची तार जमिनीवर पडली होती. यावेळी तेथे चरण्याकरिता आलेल्या २० गायींचा विजेचा झटका लागल्यामुळे त्यातील २० गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील ‘सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये घडली.
विजेच्या झटक्याने २० गायींचा मृत्यू झाल्याने गायींच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील सांगितले आहे.