कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली आहे. कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे आई-वडिलांना आपल्या एकुलत्या एक मुलीचा मृतदेह दुचाकीवर नेण्यास भाग पडले. परंतु गभाना येथील आपल्या घरी पोहोचण्यापूर्वी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली, त्यात आईही मरण पावली आणि वडील गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तरप्रदेशातील अकराबाद येथे राहणारा सत्यवीर सिंह पत्नी प्रीतीसमवेत विजय नगर गाझियाबाद येथे कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगीही होती. बुधवारी त्यांची एकुलती एक मुलगी गुंजनची प्रकृती खालावली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
लॉकडाऊनमुळे त्यांना मुलीचा मृतदेह नेण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नाही. म्हणून पती-पत्नीने दुचाकीवरून आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि ते अंत्य संस्कारांसाठी त्यांच्या गावी निघाले. मात्र दुपारी अज्ञात वाहनाने गभाना महामार्गावर दुचाकीला धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर सत्यवीर गंभीर जखमी झाला.
कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तसेच जखमी सत्यवीरला रुग्णालयात दाखल केले आहे. घरातील सदस्यांकडून माहिती मिळताच कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात एसपी सिटी अभिषेक कुमार यांचे म्हणणे आहे की, हे लोक आपल्या मुलीचा मृतदेह मोटारसायकलवरून घेऊन गाझियाबादहून येत होते. वाटेत एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला.
मुंबईच्या काही भागात टोळ दिसू लागल्याने एकच खळबळ