घरताज्या घडामोडीसाक्षरतेमध्ये महाराष्ट्राला पहिल्या पाचातही स्थान नाही!

साक्षरतेमध्ये महाराष्ट्राला पहिल्या पाचातही स्थान नाही!

Subscribe

देशात विविध माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारे साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरू असतात. देशात साक्षरतेमध्ये केरळ आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये यंदाही पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दक्षिणेकडील आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.

देशात साक्षरतेचे राष्ट्रीय सरासरीचे प्रमाण ७७.७ टक्के आहे. आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण ६६.४ टक्के आहे. तर आधी बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७०.९ टक्के आहे. तेलंगण ७२.८ टक्क्यांसह राष्ट्रीय सरासरीतही मागे आहे. आसाममध्ये साक्षरतेचे प्रमाण ८५.९ टक्के, उत्तराखंडमध्ये ८७.६ टक्के आणि कर्नाटकात ७७.२ टक्के आहे. उत्तराखंड ८७.६ टक्क्यांसह साक्षरतेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो तर साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

साक्षरतेमध्ये पहिलं स्थान कायम

केरळने साक्षरतेमध्ये पहिलं स्थान कायम राखलं आहे. पण त्याचबरोबर पुरूष आणि महिला साक्षरतेमधील अंतर अवघे २.२ टक्के आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. पुरुष ८४.७ टक्के तर ७०.३ टक्के महिला साक्षर आहेत. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सहाव्या स्थानी

महाराष्ट्र या यादीत सहाव्या स्थानावर आहे. साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात स्थान मिळवू शकलेला नाही. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल १२.३ टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला ७८.४ टक्के साक्षर महिला आहेत.


हे ही वाचा – ऑनलाईन मागवला कॅमेरा आल्या चपला!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -