नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. तर याच साध्वी प्रज्ञा शहिद हेमंत करकरे यांना देशद्रोही म्हणाल्या होत्या.
#WATCH BJP Bhopal Lok Sabha Candidate Pragya Singh Thakur says 'Nathuram Godse was a 'deshbhakt', is a 'deshbhakt' and will remain a 'deshbhakt'. People calling him a terrorist should instead look within, such people will be given a befitting reply in these elections pic.twitter.com/4swldCCaHK
— ANI (@ANI) May 16, 2019
काय आहे वाद
‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चुकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवले. ते देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते, अशी वादग्रस्त टीका साध्वींनी केली होती. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. आता नथुरामबाबत प्रश्न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासन याने नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे वक्तव्य केले. याच वक्तव्याचा साध्वी प्रज्ञा यांनी समाचार घेतला आणि जे लोक नथुरामला दहशतवादी समजतात त्यांना धडा शिकवला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.