घरदेश-विदेशलोकसेवा आयोग परीक्षेच्या गुणांकनात लवकरच मोठे बदल

लोकसेवा आयोग परीक्षेच्या गुणांकनात लवकरच मोठे बदल

Subscribe

देशभरात होणाऱ्या लोकसेवा आयोग परीक्षेच्या नियमावलीत गुणपद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवाराचे केवळ पुस्तकी नाही तर व्यवहारज्ञानही तपासले जाणार आहे. प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू होताना विद्यार्थ्याला परीक्षेत मिळालेले गुण हा एकमेव मापदंड नसेल. लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन येथे आयोजित केल्या जाणाऱ्या १५ आठवड्यांच्या फाऊंडेशन कोर्समधील कामगिरी आता ग्राह्य धरली जाणार आहे. लवकरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हे बदल केले जाणार आहेत.

केवळ पुस्तकी नाही तर व्यवहारज्ञानही तपासणार –

- Advertisement -

या ठिकाणी केलेल्या कामगिरीवरून अधिकाऱ्याला त्याचे केडर दिले जाणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवा निवडण्याची मुभा होती. मात्र आता त्यामध्ये बदल होणार आहे. देशाच्या नव्या आयएएस अधिकाऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा ट्रेनिंगमध्ये व्यावहारिक ज्ञानही मिळावे यासाठी हा बदल केला जाणार आहे. राजकीय यंत्रणा आणि त्याचा प्रशासनावरील प्रभाव समजावा, यासाठी मोदी सरकारने सध्याच्या यंत्रणेमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे.

नव्या नियमांनुसार कोणती सेवा मिळणार –

- Advertisement -

नव्या नियमांनुसार ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचं केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील. त्यानंतर त्यांचा रँक ठरेल. तुम्हाला मुख्य परीक्षेतील गुणांमुळे आएएस पद मिळाले असेल तरीही ट्रेनिंगमधील कामगिरीमुळे आयएएस केडर मिळेलच असे नाही. तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकारी पदासाठी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानही तपासले जाणार आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -