पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल गेल्या ६ दिवसापासून आमरण उपोषण करत आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी हार्दीक पटेल आमरण उपोषण करत आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी हार्दिक पटेल याने जल त्याग केला आहे. अमरण उपोषणामुळे हार्दीक पटेलचे ५ किलो वजन कमी झाले असून शरीरात पाणी कमी पडल्यामुळे युरीन इन्फेक्शन झाले आहे.
आज उपवास आंदोलन का छठा दिन हैं।मैंने आज से पानी का भी त्याग किया हैं जब तक किसानों की क़र्ज़ा माफ़ी और सामाजिक न्याय के तहत आरक्षण नहीं मिलेगा तब तक उपवास आंदोलन और लड़ाई जारी रहेगी,भाजपा सरकार और पुलिस की तानाशाही के ख़िलाफ़ युवाओं ने मुंडन कर विरोध जताया pic.twitter.com/lQ47zDbR3Z
— Hardik Patel (@HardikPatel_) August 30, 2018
गुजरातमध्ये जनतेचा आवाज दाबला जातोय
हार्दीक पटेलने ट्विट करुन इशारा दिला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, “लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज कोणतेही सरकार दाबू शकत नाही. जर जनतेच्या आवाजाला दाबले तर मोठा विस्फोट होईल. गुजरातमध्ये ज्याप्रकारे जनतेचा आवाज दाबला जात आहे. त्याविरोधात मी दावा करुन सांगतो की, सरकारच्याविरोधात जनता विस्फोट करेल.”
सर्वोच्च न्यायालय ने भी कहा है कि जनतंत्र में जनता की आवाज को कोई भी सरकार नहीं दबा सकती,अगर उनकी आवाज को दबाया तो बड़ा विस्फोट होगा!! गुजरात में जिस तरह से जनता की आवाज को दबाया जाता है।मैं दावे के साथ कहता हूँ संपूर्ण लोक क्रांति का आह्वान है।सत्ता के खिलाफ जनता का विस्फोट होगा
— Hardik Patel (@HardikPatel_) August 30, 2018
शेतकऱ्यांसाठी तुला लढायचे आहे – हार्दिकचे आजोबा
हार्दिक पटेल ज्या ठिकाणी उपोषण करत आहे त्याठिकाणी त्याचे आजोबा भेटायला आले होते. त्यासंदर्भात त्यांनी भावनिक ट्विट करत सांगितले, “आज आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी माझे आजोबा गावावरुन मला भेटायला आहे. मला पाहून आजोबा दुखी झाले त्यांच्या डोळ्यात पाणी होते. पण त्यानंतर त्यांनी सांगितले बाळा तू लढ, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. गेलेला आमचा काळ चांगला होता मात्र येणारा काळ खूप खराब आहे. तुला लढायचे आहे. देशाचा अन्नदाता गरीब आणि लाचार झाला आहे. मात्र आता शांत बसणार नाही.” असे ट्विटमध्ये हार्दिक पटेल याने सांगितले आहे.
आज उपवास आंदोलन के छठे दिन मेरे दादा गाँव से मुझे मिलने आए।दादा की आँखे नम थी और दुखी थी, फिर भी कहाँ की बेटा लड़ किसानों की बात हैं।बिता कल हमारा मज़बूत था लेकिन आनेवाला कल बहुत बुरा हैं।तुझे लड़ना है,देश को खिलाने वाला किसान ग़रीब और लाचार हो गया हैं लेकिन अब सहन नहीं करेंगे। pic.twitter.com/hL21PGoY3K
— Hardik Patel (@HardikPatel_) August 30, 2018
अहमदाबादमध्ये जमावबंदी लागू
पाटीदार समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने जाहीर न केल्यामुळे हार्दिक पटेल २५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसला आहे. ऑगस्ट २०१५ला पाटीदार समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. ते पाहता प्रशासन यावेळी कोणतिही जोखीम उचलायची नाही. त्यामुळे अहमदाबादमध्ये १४४ कलम म्हणजे जमाबंदी लागू करण्यात आली आहे. हार्दिक पटेलच्या घराच्या आसपास पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदाबादच्या पाटीदार समाजाच्या परिसरावर देखील पोलिसांची कडी नजर आहे.