घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

नरेंद्र मोदी यांनी 'भारत माती का जय' बोलण्यापेक्षा 'अनिल अंबानी की जय बोलावं' अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टिका केली आहे.

तेलंगनामध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार हल्ले – प्रतिहल्ले होताना दिसत आहेत. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट रोजगाराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. शिवाय, नरेंद्र मोदी यांनी ‘भारत माती का जय’ बोलण्यापेक्षा ‘अनिल अंबानी की जय बोलावं’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. तसेच त्यांनी ‘नीरव मोदी की जय, ललित मोदी की जय’ अशा घोषणा द्याव्यात असे देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. २०१४ साली सत्तेवर येताना नरेंद्र मोदी यांनी २ कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं. पण, प्रत्यक्षात मात्र काय परिस्थिती आहे? अल्वारमधील चार युवकांनी नोकरी नसल्यानं आत्महत्या केली. त्याला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीचं जबाबदार असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी लागणार आहेत. सध्या प्रचारादरम्यान राजकीय पक्ष परस्परांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

वाचा – एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

का केली चौघांनी आत्महत्या

मागील महिन्यामध्ये धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन चार मित्रांनी आत्महत्या केली होती. यावेळी तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला होता. चौकशीअंती या चारही जणांनी नोकरी नसल्यानं आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यावरून आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य करत टिका केली आहे. युवकांना नोकरी देण्यास मोदी अपयशी ठरल्याचं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

वाचा – मोदींनी ‘अनिल अंबानी की जय’ म्हणावं – राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -