पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र अर्थात UN च्या ऑनलाईन झालेल्या महासभेला संबोधताना थेट संयुक्त राष्ट्रालाच सवाल केला आहे. जग कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत असताना संयुक्त राष्ट आहे कुठे? सगळं जगच गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्यात आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच केलेल्या कामगिरीवर आपल्या सगळ्यांनाच गंभीर आत्मचिंतन करण्याची गरज आहे’, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले आहेत. तसेच, ‘कोरोनाच्या संकटकाळात भारतातील लस निर्मिती करण्याची क्षमता आणि ती वितरीत करण्याची प्रणाली याचा वापर फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेची या संकटकाळात मदत करण्यासाठी वापरली जाईल’, असं आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी या जागतिक व्यासपीठावर बोलताना दिलं.
#WATCH As the largest vaccine producing country of the world, I want to give one more assurance to the global community today. India’s vaccine production and delivery capacity will be used to help all humanity in fighting this crisis: PM Modi #ModiAtUN pic.twitter.com/QS5M5hltMg
— ANI (@ANI) September 26, 2020
जगातला सर्वात मोठा लस निर्मिती करणारा देश म्हणून भारताकडून मी जगाला हे आश्वासन देऊ इच्छितो की कोरोनाच्या संकटकाळात भारतातील लस निर्मिती करण्याची क्षमता आणि ती वितरीत करण्याची प्रणाली याचा वापर फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेची या संकटकाळात मदत करण्यासाठी वापरली जाईल, असं मोदी म्हणाले. ‘भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आमचा अनुभव आम्ही जगाच्या हितासाठी वापरू. दहशतवाद, तस्करी, अंमली पदार्थ अशा मानवताविरोधी शक्तींविरोधात भारत नेहमी उभा राहील’, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.