दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहे. यंदा ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवरील दाखल झाले आहेत. या ठिकाणी हजर असणाऱ्या सीमेवरील बीएसएफचे जवानांसह दिवाळी साजरा करणार असून दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटपदेखील करणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सीमेवरील जवान, सैनिकांचे कौतुक केले. तर जवानांमध्ये आल्यावरच दिवाळी सेलिब्रेशन पूर्ण होतं असेही त्यांनी म्हटले. देशातील सैनिक आहेत म्हणून देशात सण साजरे होत असल्याचे सांगितले.
I would like to extend my #Diwali greeting. I have brought the greetings of every Indian among you today: PM Narendra Modi in Jaisalmer. pic.twitter.com/UPADgnLKdv
— ANI (@ANI) November 14, 2020
तसेच, माझं दिवाळीचं सेलिब्रेशन सैनिक जवानांशिवाय अपूर्ण आहे. देशाचं रक्षण करणाऱ्या आणि राष्ट्र सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या जवानांना यावेळी मोदींनी नमन देखील केले. तर जग कितीही बदलले असेल, समीकरणं कितीही बदलली असतील तरीही सतर्कता हीच सुरक्षा आहे, सजगतेमुळेच सुख आणि समाधान येते, सामर्थ्यानेच विजय मिळतो आणि सक्षमतेनेच शांतता निर्माण होते, हे कधीही विसरून चालणार नाही. भारताकडे पराक्रमाची ताकद आणि इच्छाशकक्ती दोन्हीही आहे. सीमा सुरक्षेपासून आपण कोणतीही तजतोड करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तुम्ही हिमाच्छादीत डोंगराळ भागात किंवा वाळवंटात कुठेही असले तरी तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण होते. तुमच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो. तुमच्या शौर्याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे. जगातील कोणतीही ताकद आमच्या वीर जवांनाना देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले. ज्या देशांमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो. त्याच देशाचा विकास होत असतो, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले, दिवाळीनिमित्त सर्व सैन्य दलांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा. आपण आहात तर देश आहे, देशातील लोकांचा आनंद आहे. मी आज आपल्याकडे सर्व भारतांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. प्रत्येक ज्य़ेष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद मी आपल्यासाठी घेऊन आलोय. तुमच्यासाठी मी मिठाईपण घेऊन आलो आहे. या मिठाईमध्ये सर्व देशवासीयांचं प्रेम आणि आपलेपणाचं स्वाद आहे. या मिठाईत देशाच्या प्रत्येक आईच्या हाताची गोडी अनभवू शकता.
यावेळी मोदी यांनी चीनचं नाव न घेता चीनवर हल्ला चढवला. आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रस्त झाला आहे. विस्तारवाद ही मानसिक विकृती आहे. अठराव्या शतकातील मानसिकतेचं ते द्योतक आहे. त्याविरोधात भारत सातत्याने आपला आवाज बुलंद करेल, असा इशाराही त्यांनी दिला.