घरदेश-विदेशतरुणाला झाडाला बांधून जीवंत जाळले; संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांची गाडी पेटवली

तरुणाला झाडाला बांधून जीवंत जाळले; संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांची गाडी पेटवली

Subscribe

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गावगुंडांनी त्या तरुणाला झाडा बांधून जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी बराच वेळ आक्रोश करत गोंधळ घातला. घटनेचा निषेध करताना गावकऱ्यांनी दगडफेक केली. प्रतापगड जिल्ह्यातील फतनपूर ठाण्यात येणाऱ्या भुजोनी गावातील ही घटना असून तरुणांच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्य न दाखवल्यामुळे गावकऱ्यांच्या रागाचा पार आणखीनच चढला. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन जीपसह तीन गाड्यांना आग लावली. यात पोलिसांच्या दोनही जीप जळून गेल्या तर चार पोलीस कर्मचारी जखमी झाले.

काय आहे प्रकरण

अंबिका पटेल असे या मृत तुरणाचे नाव असून त्याचे कानपूर येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर प्रेम होते. त्याच महिला पोलिसाच्या कुटुंबियांनी तरुणाला जीवंत जाळल्याचा आरोप केला जात आहे. तिची छेड काढल्यामुळे अंबिका पटेलला तुरुंगातही जावं लागलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याची परोल जेलमधून सुटका झाली होती. सोमवारी दुपारी तरुण घरातून बाहेर पडला असता रात्री ८ च्या सुमारास त्याचा मृतदेह अर्धवच जळालेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, गावकाऱ्यांचा आक्रोश बघून चार तास पोलीस गावाबाहेरच थांबून राहिली. चार तासानंतर एसपीसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. गोंधळ घालणाऱ्या गावकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गावाती तणावाचे वातावरण पाहून तिथे काही पोसिलांना तैनात करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

रेल्वेत एकाही प्रवासी मजुराचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -