लोकसभा निवडणुकांसाठीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. हा शेवटचा टप्पा असल्यामुळे आता लोकसभेचा एकंदरीत सर्वच प्रचार थांबला आहे. मात्र शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘२०१४मध्ये मोदींच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांना तरी निवडून द्यायचं होतं’, असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या. मिर्झापूरमध्ये प्रियंका गांधींची शेवटची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
एएनआय या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका म्हणाल्या, ‘तुम्ही आता हे समजून घ्या की जगातल्या सर्वात मोठ्या अभिनेत्याला तुम्ही आपला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं आहे. याहून चांगलं तर तुम्ही अमिताभ बच्चन यांना तरी निवडून द्यायचं होतं. हेही अभिनय करतात, तेही अभिनय करतात. पंतप्रधान म्हणून तसंही यांना काही काम करायचंच नव्हतं. मग ते काय वाईट होते?’ असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.
Priyanka Gandhi Vadra in Mirzapur: Ab aap samajh lijiye ke apne duniye ke sabse bade abhineta ko apna PM bana diya hai, is se accha toh aap Amitabh Bachchan ko hi bana dete, karna toh kisi ne kuch nahi tha aapke liye. pic.twitter.com/oYrtXdGuwS
— ANI UP (@ANINewsUP) May 17, 2019
‘मोदींनी आश्वासनं पाळली नाहीत’
दरम्यान, यावेळी बोलताना प्रियंका गांधींनी भाजपवर देखील टीका केली. ‘भाजपला फक्त सत्ता हवी आहे. मोदींनी मागच्या निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. त्याउलट काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणारा पक्ष आहे. आम्ही कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत’, असं प्रियंका म्हणाल्या. मिर्झापूरमधले काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या.
हेही वाचा – ‘मला कठीण प्रश्न विचारता, तसेच मोदींनाही विचारा’
आता प्रियंका गांधींच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी चर्चा सुरू केली आहे!
उन्हें भी बनाकर देखा था कोंग्रेस से ,कुछ नही हुआ था ?? pic.twitter.com/baYBMw3BEm
— Woke Raja babu ? (@GaurangBhardwa1) May 17, 2019
I really want to read an autobiography of @SrBachchan. I hope he reveals truths about his relationship with #Congress & clears his conscience – #RajivGandhi, #bofors #PanamaPapers, #IndiraGandhi, #AmarSingh, #Rekha… He still wud remain an icon forever, will be forgiven. #BigB
— devulapalli C (@dc2727) May 17, 2019
देश का सबसे बड़ा अभि नेता जो धोखे से नेता बन गया वह सभी जानते हैं देश के लोग जिसे कॉमेडियन होना चाहिए था
— AK Mishra?? (@Amankumramishra) May 17, 2019