राजस्थान राज्यातील निवडणुकीला आता फक्त काहीच दिवस बाकी राहिले आहे. राजकीय पक्षांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून आरोप प्रत्यारोपाचे समिकरण बघायला मिळत आहे. काँग्रेस अध्यत्रक्ष राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेचे उत्तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी प्रचारादरम्यान दिले आहे. राहुल गांधींनी हिदूत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवू नये असे वक्तव्य इराणी यांनी केले आहे. राहुल गांधीनी अगोदर त्यांच्यामधील हिंदूत्व सिद्ध करावा आणि मग टीका करण्याचा सल्लाही त्यांना दिला. यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही राहुल गांधींवर टीका केली होती.
काय म्हणाल्या स्मृती इराणी
“बघा कसे दिवस आले आहेत. जे राहुल गांधी हिंदूना दहशतवादी म्हणून संबोधत होते. आज हिंदूत्वावर व्यक्तव्य करतात. ते राहुल गांधी ज्यांना मध्यप्रदेश येथे त्यांचे गोत्र काय होते या बद्दल माहिती नव्हती. आज नरेंद्र मोदींना समजवणार की हिंदूत्वाची व्याख्या काय आहे. राहुल गांधींनी घेतलेल्या सभेत लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले.”- वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी
सभेत काय म्हणाले होते राहुल गांधी
“हिंदू धर्माचा सार काय आहे? गीता काय उपदेश देते? याचे ज्ञान तुम्हाला आहे का. देशाच्या पंतप्रधानांना हिंदू धर्माचा पाया माहिती नाही. ते कशा प्रकारचे हिंदू आहेत.”- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
किसान देश पर भार नहीं हैं।
किसान देश का सार हैं|देश का किसान संकट में है|
उनकी उम्मीद टूट रही है।
उनके दिल में दर्द है।हम किसान को अकेला नहीं छोड़ सकते।
चाहे कानून बदलना पड़े, सरकार बदलनी पड़े या प्रधानमंत्री बदलना पड़े, हम किसान का साथ देंगे। किसान के साथ न्याय होगा। pic.twitter.com/uiZ9lyCgET
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 30, 2018