घरदेश-विदेशअयोध्येत गगनाला भिडणारे मंदिर बांधणार

अयोध्येत गगनाला भिडणारे मंदिर बांधणार

Subscribe

झारखंडमध्ये अमित शहांची सभा

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शाहांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. ‘अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि अयोध्येत आता गगनाला भिडणारे मंदिर बांधले जाणार’, अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे.

‘अयोध्येत मंदिर व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते. पण काँग्रेसने खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचे की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढ्या वर्षांपासून खटलाच चालत नव्हता. श्रीरामाच्या कृपेने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे’, असे अमित शहा म्हणाले. अमित शहांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढल्याचाही उल्लेख या प्रचारसभेत केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या नादात देशाला ७० वर्ष अडकून ठेवले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. स्पष्ट बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या सरकारने घेतला, असे शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -