घरदेश-विदेशमोदींच्या भाषणावर रामकृष्ण मठातील साधू नाराज!

मोदींच्या भाषणावर रामकृष्ण मठातील साधू नाराज!

Subscribe

स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर येथील रामकृष्ण मिशन मठाला भेट दिली. यावेळी मोदी यांनी भाषण केलं. मठात झालेल्या भाषणात मोदी यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या त्या भाषणावर मठातील साधू नाराज झाले आहेत. रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादस्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं बघून खूप वाईट वाटलं. अशी नाराजी यावेळी साधूंनी व्यक्त केली. पंतप्रधान दोन दिवसीय कोलकत्ता दौऱ्यावर होते. यावेळी मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तानं मोदींनी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मठाला भेट दिली होती.

यावेळी मोदींनी भाषणात सुधारित नागरिकत्त्व कायद्यावर भूमिका मांडली. विरोधकांवरही टीका केली आहे. त्यांच्या या भाषणानंतर मात्र तिथले साधू नाराज झाले आहेत. स्वर्गीय स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी संदर्भात भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद असलेल्या विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं पाहून खूप दु्ःख वाटलं,” असं ते म्हणाले.

- Advertisement -

मोदींच्या भाषणाविषयी बोलताना मठाचे सचिव स्वामी सुविरनंदा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी केलेल्या भाषणावर काही मत व्यक्त करायचं नाही. ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंवादासाठी आलो आहोत,” असं ते म्हणाले. तर रामकृष्णच्या एक विद्यार्थी म्हणाला, “मी बेलूर मठ प्रशासनाला मोदींची भेट रद्द करण्याची विनंती केली होती. लोकांसमोर अडचणी निर्माण करणाऱ्या माणसांना बोलवायला नको,” असं त्यानं सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -