सतराव्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून ‘माझ्या विजयामुळे धर्माचा विजय होणार आणि अधर्माचा नाश होणार आहे‘, असे म्हणत भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळच्या मतदारांचे आभार मानले असून भोपाळ मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर या काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लढत आहेत.
BJP Bhopal candidate Pragya Singh Thakur on trends showing she is leading: Nischit meri vijay hogi, meri vijay mein dharm ki vijay hogi, adharm ka naash hoga. Mein Bhopal ki janta ka aabhaar deti hun. pic.twitter.com/d2zZ0LPptQ
— ANI (@ANI) May 23, 2019
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा
सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील मतदानाच्या निकालाचे कल हाती आल्यावर प्रज्ञा सिंह सुमारे ७० हजार मतांनी पुढे असल्याचे चित्र आहे. माझा विजय हा धर्माचा विजय असेल. माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल. भोपाळच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’, असे त्या म्हणाल्या आहेत. मात्र अंतिम निकाल गुरुवारी रात्री पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
वाचा – स्मृती इराणी जोमात, राहुल गांधी कोमात