अंधश्रद्धा निर्मूलनाचे बरेच प्रयत्न सुरु असले तरी अंधश्रद्धेमुळे बळी जाणाऱ्या घटना अजूनी घडताना दिसत आहे. झारखंडमध्ये अंधश्रद्धेमुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अंधश्रद्धा कधी संपणार? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आजारी पडलेल्या मुलीला तिचे कुटुंबिय रुग्णालयात न घेऊन जाता एका तांत्रिकाकडे घेऊन गेले. तिथे त्या तांत्रिकांनी तिच्यावर उपचार म्हणून शरीरावर त्रिशूलने भोसकले आणि तिचे डोळे काढले. अखेर उपचारासाठी आलेल्या मुलीला आपला प्राण गमवावा लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तांत्रिकांना आणि मुलीच्या कुटुंबियाचतील काही सदस्यांना अटक केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
झारखंडच्या गर्व येथे राहणारी रुदनी देवी ही लहान मुलगी आजारी पडली. मात्र, तिच्या कुटुंबियांनी रुदणीला रुग्णालयात न नेता तांत्रिकाकडे नेले. आलम देवी आणि सतेंद्र ओरन असे तांत्रिकाचे नावे आहेत. या तांत्रिकांनी रुदणीच्या अंगात आत्मा शिरल्याचे म्हटले. याशिवाय त्यांनी त्रिशूलच्या सहाय्याने रुदनीच्या अंगावर भोसकले. याशिवाय रुदनीचे डोळे काढले. त्यांच्या या अमानुष वर्तवणुकीमुळे अखेर रुदनीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुदनीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेहाचा बंदोबस्त करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस योग्य वेळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुदनीच्या कुटुंबियांना आणि दोन्ही तांत्रिकांना अटक केली.