आयसीसी महिला क्रिकेट संघाने टी २० विश्वचषकाच्या सलामीत भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले होते. आयसीसी महिला क्रिकेट संघाला टी २० विश्वचषकाच्या सालामीत भारताविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिकंत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
#TeamIndia begin the #T20WorldCup campaign with a win over Australia ??? #AUSvIND pic.twitter.com/JKcPaGUibf
— BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2020
ऑस्ट्रेलियाच्या संघाला १२ चेंडूत २७ धावा हव्या होत्या मात्र भारताने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले. भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. पहिल्या नऊ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५८ धावांवर दोन गडी बाद अशी होती. मात्र नंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ११५ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकत मालिकेची विजयाने सुरुवात केली.
Munni Devi, mother of Poonam Yadav who took 4 wickets in today's #AUSvIND T20 World Cup 2020: I am very happy and proud on India's victory today. The girls started off with a little bit of difficulty but managed the game well till the end. #Agra pic.twitter.com/xMNNL7JLhq
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2020
फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले.या दमदार विजयाबाबत बोलताना पूनम यादवची आई मुन्नी देवी म्हणाली, “भारताच्या विजयाने मी खूप आनंदी आहे. मला टीम इंडियाच्या आजच्या विजयाचा खूप अभिमान आहे. महिला संघाने सामन्यात सुरूवात थोडीशी खराब केली होती, पण अखेरीस त्यांनी सामना जिंकला याचं मला समाधान वाटते.”