घरदेश-विदेशनीट, जेईई परीक्षांबाबत सहा राज्यांची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली

नीट, जेईई परीक्षांबाबत सहा राज्यांची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली

Subscribe

देशातील सहा राज्यांनी नीट, जेईई या परीक्षांबाबत फेरविचार करावा म्हणून दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली असून या परीक्षा घेण्यास पुन्हा एकदा हिरवा कंदील दिला आहे. जेईई मेन परीक्षा १ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाली असून ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

जेईई आणि नीट यूजी परीक्षा कोरोना काळातही आरोग्यासंबंधी सुरक्षिततेचे नियम पाळून घेतल्या जाव्यात असा निर्णय सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी दिला होता. या निर्णयाविरोधात देशातील सहा राज्यांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. ती कोर्टाने फेटाळली.

- Advertisement -

न्या. अशोक भूषण, न्या. बी. आर. गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. बिगर भाजप सरकार असलेल्या ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. यात सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आली आहे की न्यायालयाने नीट-जेईई वरील आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांमध्ये मोलोय घटक (मंत्री, प. बंगाल), डॉ. रामेश्वर उरांव (मंत्री, झारखंड), डॉ. रघु शर्मा (आरोग्यमंत्री, राजस्थान), अमरजीत भगत (मंत्री, छत्तीसगड), बलबीर सिंह सिद्धू आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -