घरदेश-विदेशभारताला उष्णतेच्या लाटेचा बसू शकतो फटका

भारताला उष्णतेच्या लाटेचा बसू शकतो फटका

Subscribe

उष्णतेच्या लाटेचा भारताला मोठा फटका बसू शकतो. जागतिक तापमान वाढीमुळे हा धोका फार लांब नाही. जगाच्या तापमानात दोन अंश सेल्सियसने जरी वाढ झाली तर भारताला उष्ण हवेच्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. विशेष म्हणजे २०१५ साली भारताला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. त्यात २५०० लोक मृत्युमुखी पडले होते.

जगातील वातावरणात होत असलेल्या बदलांच्या संदर्भात आयपीसीसीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीच्या भारताला असलेल्या गंभीर धोक्यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. तसेच युनायटेड किंग्डममधील कार्बनब्रिफ या हवामानासंदर्भात माहिती देणार्‍या संकेतस्थळाने भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार मोठ्या शहरांसंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. या चारही शहरांमधील सरासरी तापमान गेल्या 147 वर्षांमध्ये 1 डिग्रीने वाढल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

- Advertisement -

तापमान वाढीबाबत धोक्याचा इशारा देताना या अहवालात 2030 पर्यंत जगाचे सरासरी तापमान 1.5 डिग्रीच्या स्तरावर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. जर याच गतीने तापमान वाढत राहिले तर 2030 ते 2052 या दरम्यान जागतिक तापमान 15 डिग्री सेल्सीयसने वाढू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

यावर्षी डिसेंबर महिन्यात वातावरणातील बदलांसंदर्भात पोलंडमध्ये होणार्‍या बैठकीत या अहवालामधील काही निष्कर्षांवर चर्चा होणार आहे. तसेच वातावरणातील बदल रोखण्यासाठी सरकारांकडून पॅरिस कराराची समीक्षाही करण्यात येईल. जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणार्‍या देशांपैकी एक असल्याने भारतही या बैठकीत महत्त्वाच्या भूमिकेत असेल.

- Advertisement -

या उष्णतेच्या लाटेचा पाकिस्तानातील कराची आणि भारतातील कोलकाता या भारतीय उपखंडामधील शहरांना सर्वाधिक फटका बसेल. या दोन्ही शहरात 2015 सारखी स्थिती उद्भवू शकेल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -