गुरे चोरीच्या संशयावरुन बिहारमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहारच्या छपरा जिल्ह्यात बनियापुर गावात मॉब लिंचिंगची घटना आज घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लोकांच्या मारहाणीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. त्याचबरोर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
बनियापुरात गावात आज सकाळी गाई-म्हशी चोरीला गेल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे सगळे गावकरी चोरट्यांना शोधत होते. दरम्यान, लोकांनी तीन जणांवर संशय घेतला आणि त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. जमावाने तिघांना प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. परंतु, पोलीस घटनास्थळावर पोहचेपर्यंत उशिर झाला. याप्रकरणी पोलीस तपास घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांवर मोठे दु:ख ओढवले आहे. कुटुंबिय प्रचंड आक्रोश करत आहेत. भारतात मॉब लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी बकरा चोकरीवरुन मध्य प्रदेशमध्ये तीन तरुणांना जमावाने जोरदार मारहाण केली होती.
Bihar: Three people were beaten to death by locals in Baniyapur, Saran on suspicion of cattle theft, today morning. Bodies sent for postmortem by police, investigation underway. pic.twitter.com/wNKJIYgfn5
— ANI (@ANI) July 19, 2019
हेही वाचा – राजीव गांधी हेच मॉब लिंचिंगचे खरे जनक – भाजप