घरदेश-विदेशभरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत; ८ जण ठार, ६ गंभीर जखमी

भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत; ८ जण ठार, ६ गंभीर जखमी

Subscribe

या घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ गंभीर जखमींना स्थानिकांनी जवळील रुग्णालयात दाखल

बिहारच्या लखीसरायमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या वरातीमध्ये वेगवान ट्रक घुसल्याने ८ जणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

अशी घडली घटना

बिशनपूर गावातून निघालेली ही लग्नाची वरात लखीसराय येथील हलसी बाजारातून जात होती. यावेळी भरधाव असलेला ट्रक या लग्नाच्या वरातीत थेट घुसला. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वरातीमधील १० ते १५ लोक ट्रक खाली चिरडले गेले. त्याआधी हा ट्रक परिसरातील विजेच्या खांबाला जाऊन धडकला होता.

- Advertisement -

या घडलेल्या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ गंभीर जखमींना स्थानिकांनी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली, असून फरार चालकांचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -