घरदेश-विदेशआयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर तरुणाने केली आत्महत्या

आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर तरुणाने केली आत्महत्या

Subscribe

आयपीएलच्या अंतिम सामन्यावर तरुणाने सट्टा लावला होता. मात्र सट्ट्यात पैसे हारल्यामुळे या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

झारखंडमध्ये एका तरुणाने आयपीएलच्या सामना संपल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यावर या तरुणाने सट्टा लावला होता. मात्र सट्ट्यात पैसे हारल्यामुळे या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडच्या बोकारो गावामध्ये ही घटना घडली आहे. शुभम असं या तरुणाचे नाव आहे. त्याने गळफास लावून आत्महत्या केली. माराफारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असून पोलीस तपास करत आहे.

काय आहे घटना 

मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षाच्या शुभमला त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुनिलाल यांनी घराची देखभाल करण्यास सांगितले होते. मुनिलाल हे एका लग्नासाठी गावी गेले होते. घराची देखभाल करण्यासाठी मुनिलाल यांनी शुभमला घराची चावी देखील दिली होती. आयपीएलचा सामना संपल्यानंतर शुभम मुनिलाल यांच्या घराची देखभाल करण्यासाठी रात्री त्यांच्या घरी निघून गेला. मात्र सकाळी ८ वाजेपर्यंत शुभम आपल्या घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी मुनिलाल यांच्या घरी धाव घेतली.

- Advertisement -

सट्ट्यामध्ये पैसे हारल्याने आत्महत्या?

मुनिलाल यांच्या घराचा दरवाजा वाजवून देखील कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शुभमच्या कुटुंबियांनी दरवाजा कसा तरी खोलून मुनिलाल यांच्या घरामध्ये प्रवेश केला. तेव्हा सर्वांना धक्का बसला कारण शुभमने मुनिलाल यांच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केला होती. दरम्यान, अशी देखील माहिती समोर आली आहे की, शुभम नेहमी सट्टेबाजी करायचा. शुभमच्या कुटुंबियांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभमचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. दरम्यान, या प्रकरमाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -