घरदेश-विदेशयुवक, शेतकरी, गरिबांच्या आशेचा विजय - अमित शहा

युवक, शेतकरी, गरिबांच्या आशेचा विजय – अमित शहा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देखील ट्विटद्वारे विजयासाठी जनादेशाला श्रेय दिले आहे.

१७व्या लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे पहिली प्रतिक्रिया दिल्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शहांनीदेखील ट्विटव्दारे विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी विरोधकांवर टीका केली असून देशातील नागरिकांच्या आशेचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

जनतेने केली विकासाची निवड

भाजप अध्यक्ष अमित शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, हा संपूर्ण भारताचा विजय आहे. तसेच देशातील तरूण, गरीब आणि शेतकऱ्यांच्या आशेचा हा विजय आहे. हा भव्य विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ वर्षातील विकास आणि कणखर नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विजय आहे. मी भाजपच्या करोडो कार्यकर्त्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दीक शुभेच्छा देतो. अमित शहा यांनी ट्विट्वद्वारे जनतेच्या विश्वासाचे कौतुक तर केलेच. पण त्याहून त्यांनी आणखीन एक ट्विट करून विरोधकांच्या दणदणीत पराभवावर टोला लगावला आहे. अमित शहा आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, हा परिणाम म्हणजे विरोधकांच्या अपप्रचार, खोटा प्रचार, जातियवाद आणि परिवारवादा विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. तसेच जातियवाद आणि परिवारवादाचा समूळ नायनाट करत देशातील जनतेने विकास आणि राष्ट्रवादाची निवड केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -