घरमनोरंजनप्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा 'एक होतं पाणी'

प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘एक होतं पाणी’

Subscribe

येत्या १० मे पासून ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. ‘एक होतं पाणी’  नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारा ठरेल हे नक्की. अभिनेत्री वर्ष उसगांवकर यांच्या हस्ते ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर पाहून अतिशय भावुक होत वर्ष उसगांवकर यांनी , ”पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटांतून होणारं प्रबोधन हे मोठ्या स्तरावर होत असतं त्यामुळे असे विषय सातत्याने येत राहावेत” असं आपलं मत मांडलं. तसेच निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाचे विशेष कौतुक करत चित्रपटाच्या या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बोभाटा’, ‘भान राहील’, ‘चला चला’, आणि ‘एक होतं पाणी’ अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत हेते. आनंदी जोशी, हृषीकेश रानडे, रोहित राऊत, मृण्मयी दडके पाटील आणि विकास जोशी यांनी ही गाणी गायली आहेत.

- Advertisement -
एक होतं पाणी ट्रेलर लाँच
एक होतं पाणी ट्रेलर लाँच

‘एक होतं पाणी’ अनेर पुरस्कारांनी पुरस्कृत

अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या  ‘एक होतं पाणी’ ने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्ब्ल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये; ‘विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. एक होता राजा.. एक होती राणी आता म्हणू नका ‘एक होतं पाणी’ अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

काय आहे कथा

दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट आहे. ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे… प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये… पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण… म्हणजेच ‘एक होतं पाणी’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -