बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता परेश रावल या दोघांची कॅमेस्ट्री चांगलीच चर्चेत असते. अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. २०१२ साली सर्वत्र प्रदर्शित झालेला Oh My God हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या चित्रपटातीस अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांचे चांगलेच कौतुक केले होते. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, पुन्हा एकदा चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाचे शूटिंग उन्हाळ्यामध्ये सुरू होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
View this post on Instagram
अभिनेता अक्षय कुमारचे अनेक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. अक्षय सध्या त्याच्या आगामी बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून काही दिवसांपूर्वी अक्षयने या चित्रपटाचा फस्ट लूक शेअर केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार म्हणून अक्षय कुमारची सध्या चर्चा सुरू आहे. अक्षय त्याच्या एका चित्रपटासाठी १३५ कोटी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
His one look is enough! #BachchanPandey releasing on 26th January, 2022! #SajidNadiadwala @farhad_samji @kritisanon @Asli_Jacqueline @ArshadWarsi @NGEMovies pic.twitter.com/ZFiPPJax7R
— Akshay Kumar (@akshaykumar) January 23, 2021
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने २०२२ साली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी त्यांचे मानधन वाढवले आहे. २०२० च्या सुरूवातीला त्याने १०२ कोटी मानधन घेण्याची घोषणा देखील केली होती. मात्र कोरोनानंतर त्याने या मानधनात वाढ करून १२३ कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
View this post on Instagram
पहिल्याच दिवशी मिशन मंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर जगन शक्ती आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मोठं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.‘बॉलिवूड हंगामा’नुसार, अक्षय कुमार आणि जगन शक्ती मिशन मंगलनंतर मिशन लायन या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी जगन शक्ती तब्बल ४ कोटी रुपये मानधन घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जगन शक्तीप्रमाणेच अक्षयनेदेखील या चित्रपटासाठी तगडं मानधन घेतले आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू आणि जॅकी भगनानी करणार असल्याचे सांगितले जात आहे.