घरताज्या घडामोडीसामान पुन्हा एकदा हरवल्याबद्दल किर्तीने मानले एअर इंडियाचे आभार

सामान पुन्हा एकदा हरवल्याबद्दल किर्तीने मानले एअर इंडियाचे आभार

Subscribe

हाऊसफूल ४ फेम किर्ती खरबंदा ही सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे अपडेट देत असते. नुकतेच तिने हवाई प्रवासातील तिचा अनुभव सांगत एयर इंडियाला ट्विटरवर टॅग करत त्याचा जाब विचारला आहे.

आपल्या मतांबाबत कायम ठाम असणारी अभिनेत्री म्हणून ओळख असलेली किर्ती खरबंदा आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. हाऊसफूल ४ फेम किर्ती खरबंदा ही सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे अपडेट देत असते. नुकतेच तिने हवाई प्रवासातील तिचा अनुभव सांगत एयर इंडियाला ट्विटरवर टॅग करत त्याचा जाब विचारला आहे.

काय म्हणाली किर्ती?

- Advertisement -

 

अभिनेत्री किर्ती खरबंदा ही तिच्या खासगी आयुष्यावरून कायम चर्चेत असते. यावेळी ट्विटरवर एअर इंडियाला टॅग करत तिने म्हटले लिहिले आहे, ‘ माझे सामान पुन्हा एकदा हरवल्याबद्दल तुमचे खूप आभार’. तसेच, तिने सांगितले आहे की एअर इंडियाला त्यांच्या कर्मचाऱ्यांना थोडी शिस्त शिकवणे देखील गरजेचे आहे. किर्तीच्या या ट्विटला एअर इंडीयाने झालेल्या प्रकाराविषयी दिलगीरी व्यक्त करत आपले हवाई प्रवासाचे तपशील द्या. आम्ही आपले सामान आपल्यापर्यंत पोहचवू, अशी हमी दिली आहे.

- Advertisement -

 

किर्तीने पुढे संभाषण वाढवत म्हटले आहे की, ‘आपण झालेल्या प्रकाराविषयी दिलगीरी व्यक्त केली. पण, मला अद्याप माझे सामान परत मिळालेले नाही.’ तसेच, तिने एअर इंडियाच्या मुंबई आणि गोवा येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी बोलताना सांगितले की, मी माझे सामान हरवल्याची तक्रार करताना तक्रार नोंदवून घेण्याचा रस देखील त्यांना नव्हता. या ट्विटला उत्तर देत किर्तीने तिचे सामान गोवा विमानतळावर पोहचले असल्याची माहिती दिली आहे.

 

अभिनेत्री किर्ती सोबत झालेला हा पहिला प्रकार नसून या आधी देखील २०१४ मध्ये एअर इंडीयाने आपले सामान हरवल्याचे तिने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -