घरमनोरंजनपाण्याचं महत्त्व सांगणारा ‘एक होतं पाणी’

पाण्याचं महत्त्व सांगणारा ‘एक होतं पाणी’

Subscribe

रोहित राऊत, आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे या दिग्गज गायकांचा आवाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमांमधून अनेक लेखक,दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच ताज्या दमाच्या मंडळींचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘एक होतं पाणी’ असं या सिनेमाचं नाव आहे. सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या या सिनेमात एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे, असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. या सिनेमातून श्रिया मस्तेकर हा एक नवा चेहरा प्रेक्षकांसोमर येणार आहे. नुकतंच श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती लेखक आशिष निनगुरकर यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळचा एक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि अभिनेत्री श्रिया मस्तेकर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे कलाकार दिसणार चित्रपटात

हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर,रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांची भौजच चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे रोहित राऊत, आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे या दिग्गज गायकांचा आवाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.


वाचा: प्रियांकाचा होणारा पती निक जोनासला डायबिटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -