घरमनोरंजन'जीव झाला येडापिसा' या मालिकेत रंगणार अनोखी स्पर्धा

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत रंगणार अनोखी स्पर्धा

Subscribe

प्रत्येक नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास असतो. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये याच दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये शिवा आणि सिध्दीचे नाते आणि त्यांचा लग्नानंतरचा प्रवास जरा वेगळाच आहे. या दोघांनाही लग्न बंधनामधून सुटका हवी आहे. पण सिद्धी घरातील काही जिवाभावाच्या माणसांकडे बघून अजूनही लष्करेंच्या घरामध्ये राहते आहे. आता मात्र शिवा-सिद्धीच्या नात्याला निर्णायक वळण मिळणार आहे यात काही शंका नाही. लवकरच रुद्रायत गावामध्ये प्रसिध्द अशी सुरमारीची स्पर्धा रंगणार आहे. या सुरमारीच्या स्पर्धेत जो कोणी पहिल्यांदा विहिरीतून नारळ बाहेर काढेल त्या व्यक्तीची सत्ता गावामध्ये राहते अशी परंपरा आहे.

या स्पर्धेत दरवर्षी आत्याबाईंसाठी शिवा विहिरीमधून नारळ बाहेर काढत आला आहे आणि यंदा देखील आत्याबाईंनची त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. सगळे नीट सुरू असताना सुरमारीच्या स्पर्धेत शिवावर जीवघेणा हल्ला होणार आहे आणि हे सिध्दीला कळताच ती शिवाचा जीव वाचविण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारणार आहे. त्यामुळे सिद्धी शिवाचे प्राण वाचवले का? हे येत्या काळात कळेल.

- Advertisement -

या सीनसाठी शिवाबरोबरच सिध्दीने देखील खास तयारी आणि सराव केला होता. या अनुभवाबद्दल बोलताना सिध्दी म्हणजेच विदुला चौघुले म्हणाली, “जेव्हा आम्हाला ही कथा संगितली तेव्हा मला याची कल्पना देण्यात आली होती की मालिकेमध्ये सिध्दी देखील पाण्यामध्ये उडी मारते. मी स्वत: स्टेट लेव्हलची स्वीमर आहे. त्यामुळे पाणी दिसले की आतून एक इच्छा होते पाण्यामध्ये उडी मारण्याची. जेव्हा अशोक सुरमरीच्या स्पर्धेची तयारी करत होता. जेव्हा त्याचे पाण्यामध्ये उडी मारण्याचे शॉट असायचे तेव्हा वाटायचे कधी येणार तो दिवस आणि मी कधी मारणार पाण्यात उडी. सुरमरीच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली तेव्हा माझ्याजागी डमी उभा करायचा अशी चर्चा सुरू होती. पण मीच सांगितले की मी हे करू शकते. आम्ही या सुरमारीच्या स्पर्धेचे अंडरवॉटर शूट केले. खूप मज्जा आली इतके नक्की आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांनादेखील नक्की आवडेल.”

- Advertisement -

हेही वाचा – Tanhaji The Unsung Warrior: अजय देवगणने ‘या’साठी मानले ‘मनसे’चे आभार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -