घरमनोरंजन'राजा रानीची गं जोडी...', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘राजा रानीची गं जोडी…’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Subscribe

लवकरच छोट्या पडद्यावर राजा-रानीची गं जोडी ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कथेतील राजा –रानीची गोष्ट आणि त्यांचा प्रवास या सगळ्यांहून जरा वेगळा आहे. परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्ति कधीच एकत्र येऊ शकत नाही तर त्या संसार कसा बरं करू शकतील? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. सत्यात अशाच दोन व्यक्ति एकमेकांच्या प्रेमात पडतात. कारण प्रेम आणि विश्वास या जगातील अशा दोन गोष्टी आहेत ज्या अशक्य देखील शक्य करून दाखवतात. असंच एक नातं जुळतं जेव्हा अवखळ, गावात वाढलेली, हिरव्यागार रानात रमलेली संजीवनी रणजीतला भेटते. यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. आपल्याच माणसाने घेतलेल्या एका निर्णयामुळे फुलपाखरासारखे आयुष्य जगणार्‍या संजीवनीसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. काय घडतं संजीवनी आणि रणजीतच्या गोष्टीमध्ये हे ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या १८ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका कलर्स मराठीवर असणार आहे. पुन्हा एकदा अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून याची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. या मालिकेत शिवानी सोनार संजीवनी तर आणि नवोदित मनीराज पवार हे रणजीतची भूमिका साकारत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या मालिकेद्वारे अतिशय नाजूक विषयाला हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. नायिकेचा संघर्ष आणि त्याला मिळणारी नायकाची खंबीर साथ हे “राजा रानीची गं जोडी” या मालिकेमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मालिकेतून शिवानी सोनार आणि मनीराज पवार यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, रियल लोकेशन्स यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल”. 
– दीपक राजाध्यक्ष, वायाकॉम18, मराठी टेलिव्हीजन

- Advertisement -

यात संजीवनी ही अतिशय अल्लड मुलगी आहे जिची खूप साधी स्वप्नं आहेत. संजीवनीला अत्यंत लहान वयात जीवनाची खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे याचा तिला अंदाज नाहीये. स्वत:ला सांभाळताना ती संपूर्ण कुटुंबाचा आधार कशी होते हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. संसारामध्ये तुम्ही एकमेकांच्या चांगुलपणावर किती विश्वास ठेवता, कितीही संकट आली तरी देखील एकमेकांवर विश्वास ठेऊन संसार कसा निभावता हे महत्वाचे असते. मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजीतवर देखील संकट येणार आहेत आणि त्या परिस्थितीत आपली तत्व सांभाळत ते कशी एकमेकांना साथ देतात त्याची ही गोष्ट आहे”.
– विनोद लव्हेकर, निर्माते आणि दिग्दर्शक

राजा रानीची गं जोडी ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”.
– चिन्मय मांडलेकर, लेखक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -