घरमनोरंजनतीन वर्षांनंतर राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट 'हम चार'

तीन वर्षांनंतर राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट ‘हम चार’

Subscribe

सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाला येऊन तीन वर्ष झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राजश्री प्रॉडक्शन्सने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे चित्रपट म्हटले की बॉलीवूडमध्ये सर्वात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे राजश्री प्रॉडक्शन्स. आतापर्यंत कौटुंबिक चित्रपटाने प्रेक्षकांचं मन राजश्रीचे चित्रपट जिंकत आले आहेत. सुपरस्टार सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाला येऊन तीन वर्ष झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राजश्री प्रॉडक्शन्सने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मैत्रीवर आधारित असून याचा दिग्दर्शक अभिषेक दीक्षित असणार आहे. ‘राजश्री प्रॉडक्शनचा एक भाग असल्याचा आणि परिवाराची परिभाषा असणारा हा चित्रपट आहे. या युगातदेखील अशा तऱ्हेचा चित्रपट आम्ही बनवत आहोत. या चित्रपटात मैत्रीचे बंध दाखवण्यात येणार आहेत. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी राजश्री प्रॉडक्शन आणि सूरज बडजात्यांचे आभार’ अशा शब्दात अभिषेक दीक्षितने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वेगळ्या तऱ्हेने केली घोषणा

‘हम चार’ हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. आता एकत्र परिवार खूपच कमी असतात. अशावेळी आपले मित्रच आपला परिवार होतात. त्यामुळे मित्र हाच परिवार अशा कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. याची घोषणा अतिशय वेगळ्या तऱ्हेने दिग्दर्शक अभिषेक दीक्षितने केली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात पुढच्या वर्षी होणार असून यामध्ये नक्की कोणते कलाकार असणार आहेत याची माहिती मिळालेली नाही. राजश्रीच्या चित्रपटामध्ये बऱ्याच वेळा सलमान खान असतो. त्यामुळे या चित्रपटामध्येही मोठी स्टारकास्ट असणार की नवे कलाकार पाहायला मिळतील याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे. पुढच्यावर्षी याचं चित्रीकरण सुरु होणार असलं तरीही आता नक्की कोणते कलाकार यामध्ये असतील हे लवकरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -