कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थच्या आयुष्याला आता वेगळं वळणं मिळणार आहे. अनु आणि सिद्धार्थचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. या दोघांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या पण त्या सगळ्यांना अनु-सिध्दार्थ खंबीरपणे सामोरे गेले. त्या दोघांनी सान्वीच्या कटकारस्थानाला उत्तर दिलं.
हे सगळे घडतं असताना सिध्दार्थचं अनुवर असलेले प्रेम वाढतचं गेलं पण ज्या गोष्टीची वाट प्रेक्षक आणि सिध्दार्थ बघत होते. ते शेवटी घडलं प्रेम जगातील अत्यंत सुंदर भावना आहे कधी ते एका नजरेत होतं कधी सहवासातून होतं. सान्वीमुळे अनु आणि सिध्दार्थमध्ये काही काळासाठी दुरावा आला होता आणि त्या दरम्यान अनुला तिच्या प्रेमाबद्दलची जाणीव होण्यास सुरुवात झाली.
नुकतचं मालिकेमध्ये अनुने तिच्या प्रेमाची कबुली सिध्दार्थला दिली आहे. सिध्दार्थ आणि अनुच म्हणालं तर जरा वेगळं आहे, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी, अनेक गैरसमज आले. पण आता या दोघांचं नातं अजून दृढ होणार आहे. अनु-सिध्दार्थच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाच्या या सरी कुठलं नवं वळणं घेऊन येतील हे कळेलंच.
हेही वाचा – संगीतकार शेखर रवजियानीला ३ अंडे पडले महागात; आकडा बघून व्हाल थक्क