उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बकरू गावात आठ पोलिसांना ठार मारणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला उज्जैन येथून अटक करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी त्याचे एन्काउंन्टर करण्यात आले आहे. या एन्काउंन्टरवर अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे. दरम्यान अनेक विषयांवर आपली ठाम मतं मांडणाऱ्या तापसीने विकास दुबे याच्या एन्काउंन्टर टीका केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहेच मात्र तिने नेटकऱ्यांच्या टीकेचा रोष ओढावून घेतला आहे.
Wow! We did not expect this at all !!!! ?
And then they say our bollywood stories are far from reality ? https://t.co/h9lsNwA7Ao— taapsee pannu (@taapsee) July 10, 2020
असं म्हणाली तापसी…
तर ही बातमी समजताच सर्वसामान्यांसह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. या ब्रेकिंग न्यूजचा स्क्रीनशॉट अभिनेत्री टापसी पन्नूने ट्विट केला आहे. आणि असे लिहिले की, ”वाह.. असं काहीतरी होईल असा आपण विचारसुद्धा केला नव्हता. कोण म्हणतं की आमच्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या कथा खोट्या असतात?” अशी पोस्ट तापसीने केली आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
ज्यावेळी ८ पोलीस कर्मचारी मारले गेले, तेव्हा काय झोपली होतीस का, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तसेच, तुला इतका त्रास का होत आहे? जेव्हा त्याच्यामुळे आठ पोलीस शहीद झाले, तेव्हा का प्रश्न विचारले नाहीस, असे तिला विचारले जात आहे. तर काहींकडून तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली आहे. तापसीच्या चाहत्यांनी यावर तिचं समर्थन केले असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.